Premanand Maharaj On Ghost: भूत खरोखर असतं... प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर

Anirudha Sankpal

भूत कोण बनते

आत्महत्या, अपघाती मृत्यू किंवा आयुष्यात मोठी पापे केलेल्या व्यक्तीची आत्मा 'भूत' योनीमध्ये जाते, असे महाराज सांगतात.

वृंदावन आणि भूतेश्वर

वृंदावन हे क्षेत्र भगवान भूतेश्वर (शिव) यांच्या अधीन असून, तिथे अनेक अतृप्त आत्म्यांचे वास्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

रुपांतरण क्षमता

भूतांचे रूप स्थिर नसते; ते एका क्षणात अत्यंत सुंदर तर दुसऱ्या क्षणात भयावह किंवा घृणित रूप धारण करू शकतात.

दर्शनाचे कारण

भूत प्रत्येक व्यक्तीला दिसत नाहीत; ज्यांच्याकडून आपले कल्याण होईल किंवा ज्यांच्याकडे पाहून मृत्यूचे भय वाटणार नाही, अशांसमोरच ते प्रगटतात.

अतोनात कष्ट

भूत योनीत आत्मा प्रचंड यातना भोगते; समोर नदी वाहत असूनही त्यांना पाण्याचा एक थेंब किंवा अन्नाचा घास घेता येत नाही.

अशुद्धतेचा प्रभाव

जे लोक वाईट आचरण करतात किंवा अपवित्र कर्मात गुंतलेले असतात, अशा 'तमोगुणी' व्यक्तींवरच भूतांचा प्रभाव लवकर पडतो.

नामस्मरणाचे बळ

भगवंताचे नाव घेणाऱ्या किंवा मंत्रांचा जप करणाऱ्या व्यक्तीला स्पर्श करण्याची ताकद भूतांमध्ये नसते; ते नामशक्तीने भस्म होऊ शकतात.

निर्भयता

"भूत पिशाच निकट नहीं आवे" या उक्तीप्रमाणे, हनुमान चालीसा किंवा देवाचे नाव घेणाऱ्यांजवळ कोणतीही नकारात्मक शक्ती फिरकत नाही.

कल्याण मार्ग

अनेक आत्मे केवळ आपल्या मुक्तीसाठी किंवा कल्याणासाठी संतांच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा