पुढारी वृत्तसेवा
वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज अनेकदा दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे अत्यंत सोप्या भाषेत देतात.
अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, पाणी आणि विजेचा अपव्यय करणे योग्य आहे की नाही?
एकाने प्रेमानंद महाराजांना विचारले की, "वीज आणि पाण्याच्या नासाडीमुळे आपले पुण्य नष्ट होते?" तेव्हा या प्रश्नावर महाराजांनी दिलेले उत्तर जाणून घेण्यासारखे आहे.
प्रेमानंद महाराज म्हणाले की, पाण्याचा नळ विनाकारण सुरु ठेवू नका. ते पाणी कोणाच्या तरी उपयोगाला येईल.
तुम्ही व्यर्थ पाणी वाया घालवत असाल, तर तुम्हाला त्याचा कर भरावा लागत आहे, म्हणजेच तुमचे भजन कमी होत आहे आणि तुमचे पुण्य नष्ट होत आहे.
विनाकारण दिवे (लाईट) लावून विजेवा अपव्यय करु नका.
निसर्गाचा तितकाच वापर करा जितकी तुम्हाला गरज आहे, अन्यथा तुमचे पुण्य विनाकारण नष्ट होत आहे.
प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, तुम्ही निसर्गाचा जितका जास्त (अनावश्यक) उपभोग घ्याल, तितके तुमचे पुण्य क्षीण होईल.
मी तुला शरण आलो आहे, असा भाव ठेवून केलेले भजन थेट भगवंताची प्राप्ती करून देते, असे संवादाचा समारोप करताना प्रेमानंद महाराज म्हणाले.