coconut water benefits | सलग ३० दिवस रोज नारळपाणी प्यायल्यास शरीरात काय बदल होतात?

पुढारी वृत्तसेवा

सलग ३० दिवस नारळपाणी प्यायल्यास शरीरात काय बदल होतात? हे जाणून घेऊया.

नारळपाणी उन्हाळ्यातील नैसर्गिक शरीराला थंडावा देणारे पेय आहे.

तुम्ही दररोज नारळपाणी पिता तेव्हा ते हळूहळू पण लक्षणीयरीत्या फायदेशीर ठरते.

नारळपाण्याचा सर्वात तात्काळ मिळणारा फायदा म्हणजे हायड्रेशन.

नारळपाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करतात.

'हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ'च्या मते, इलेक्ट्रोलाइट्सयुक्त पेये साध्या पाण्यापेक्षा हायड्रेशनसाठी अधिक उपयुक्त ठरतात.

नारळपाणी पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे. स्नायूंचे कार्य, मज्जातंतूंचे संकेत आणि हृदयाच्या आरोग्यासाठी पोटॅशियम आवश्यक खनिज आहे.

'जर्नल ऑफ फिजिओलॉजिकल एन्थ्रोपॉलॉजी'मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, व्‍यायामानंतर शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स भरून काढण्यासाठी नारळपाणी प्रभावी ठरते.

महिनाभर नारळपाणी प्यायल्यास निरोगी रक्तदाब राखण्यास मदत होऊ शकते.

नारळपाणी ऍसिडिटी न वाढवता हायड्रेशन देते, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.

'जर्नल ऑफ द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशन'मधील एका अभ्यासानुसार, नारळपाणी हायड्रेशन आणि स्टॅमिना वाढवण्यास मदत करते.

हायड्रेशनमुळे त्वचा निरोगी राहण्‍यास मदत होते.

संशोधनानुसार, निरोगी व्यक्तींनी दिवसभरात एक ग्लास नारळपाणी प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची शक्यता कमी असते.

आहारतज्ज्ञ नेहमीच मर्यादित सेवनाचा सल्ला देतात, जास्त प्रमाणात पोटॅशियम आजार असलेल्या व्यक्तींच्या मूत्रपिंडावर (kidneys) ताण येऊ शकतो.

येथे क्‍लिक करा.