Namdev Gharal
पावसाळ्यात रस्ते अतिशय निसरडे असतात त्यामुळे टायरचे ग्रिप चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे गुळगुळीत किंवा जुने टायर्स असतील तर बदलून घ्या.
ओल्या रस्त्यावर ब्रेक पटकन लागणे आवश्यक असते. ब्रेक पॅड्स झिजलेले नसावेत, त्यामुळे ब्रेकची तपासणी करुन घ्या
रात्रीच्या वेळी मुसळधार पावसात दृश्यमानता कमी असते, त्यामुळे लाइट्सचा फोकस योग्य आहे का याची खात्री करुन घ्या.
पावसात वादळी हवेमुळे केबल्सना गंज लागू शकतो, त्यामुळे त्यांना रेग्युलर ऑइलिंग व ग्रीसिंग आवश्यक आहे. चेनलाही ग्रीसिंग करणे आवश्यक आहे.
पावसामुळे सीट भिजते व लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे वॉटरप्रूफ सीट कव्हर घाला
बाईक चालवताना पुढील चाकातून इंजिनवर चिखल उडत असतो मडगार्ड लावल्यास गाडी स्वच्छ राहते.
पावसात बराचवेळ गाडी उभी राहिल्या पाण्यामुळे शॉर्टसर्किट होऊ शकतो, त्यामुळे वायरिंग सुरक्षित आहे का हे बघा. यामुळे गाडी सुरु होण्यास अडचण येऊ शकते.
पावसामुळे प्लगला पाणी लागून, स्पार्किंग होत नाही त्यामुळे गाडी स्टार्ट होण्यास दमवते. यासाठी प्लग कोरडा राहील याची काळजी घ्या, जुना झाला असल्यास बदललेला चांगला.
गाडी पार्क करताना वॉटरप्रूफ कव्हर वापरा. यामुळे गाडी जास्तवेळ भिजल्याने येणारे प्रॉब्लेम येणार नाहीत
पावसात चिखल, खड्डयातील पाणी यामुळे दुचाकी लगेच अस्वच्छ होते. त्यामुळे वेळेत सर्व्हिंसिंग केली तर गंज कमी लागतो.