पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात फळे-भाज्या धुतल्यानंतर त्यावरील ओलावा पूर्णपणे कोरडा झाल्यावरच साठवा. जास्त ओलावा असल्यास त्या लवकर खराब होऊ शकतात.
फळे आणि भाज्या एअरटाइट डब्यांऐवजी हवेशीर कंटेनर किंवा जाळीदार टोपलीत ठेवल्यास ताजेपणा जास्त काळ टिकतो.
एक खराब फळ किंवा भाजी इतरांनाही लवकर खराब करू शकते. त्यामुळे नियमित तपासणी करून खराब झालेल्या वस्तू वेगळ्या काढा.
पालेभाज्या कोरड्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवल्यास अतिरिक्त ओलावा शोषला जातो आणि त्या जास्त काळ ताज्या राहतात.
सर्वच फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. त्यांच्या प्रकारानुसार योग्य ठिकाणी साठवणूक करा.
फ्रीजमध्ये खूप वस्तू भरल्यास थंड हवा व्यवस्थित फिरत नाही. त्यामुळे फळे-भाज्या लवकर खराब होऊ शकतात.
फ्रिजच्या व्हेजिटेबल ट्रेमध्ये स्वच्छ आणि कोरडे कापड ठेवल्यास अतिरिक्त ओलावा कमी होण्यास मदत होते.
पावसाळ्यात जास्त प्रमाणात फळे-भाज्या खरेदी करण्याऐवजी काही दिवस पुरतील इतक्याच घ्या.
पावसाळ्यात फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी वाहत्या पाण्याखाली नीट धुवा आणि शक्यतो ताज्याच वापरा.