पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे (humidity) आपल्या पचनसंस्थेवर ताण येतो, ज्यामुळे पचनशक्ती मंदावते आणि आजारांचा धोका वाढतो.
पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये कीड आणि बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पालक, मेथी यांसारख्या भाज्या खाणे टाळलेलेच बरे.
बाहेरचे उघड्यावरचे अन्न आणि जंक फूडमध्ये दूषित पाणी किंवा बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे पोटाचे गंभीर विकार होऊ शकतात.
पावसाळ्यात दुध, दही किंवा पनीर पचायला जड जाऊ शकते. यामुळे अपचन किंवा ॲसिडिटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात अन्न लवकर खराब होते. शिळ्या अन्नातून फूड पॉयझनिंगचा धोका असतो, त्यामुळे नेहमी ताजे आणि गरम अन्नच खावे.
पावसाळा हा माशांचा प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे या काळात मासे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
कच्च्या भाज्या किंवा फळे नीट धुतली गेली नाहीत, तर त्यावरील जंतू शरीरात जाऊन संसर्ग पसरवू शकतात. नेहमी शिजवलेले अन्न खा.
जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण देतात. यामुळे पोट फुगणे किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते.
पावसाळ्यात पचनासाठी आले, लसूण, आणि गरम पाण्याचा वापर करा. नेहमी घरगुती, साधे आणि पचायला हलके अन्न घेण्यावर भर द्या.