पुढारी वृत्तसेवा
हळू आणि खोल श्वास घ्या.हवा फुफ्फुसात जाताना आणि बाहेर पडताना जाणवणार्या संवेदनांवर लक्ष केंद्रित करा. यामुळे मन शांत होते.
डोक्यापासून पायांपर्यंत मनातील मनात शरीराचा प्रत्येक भागाचे निरीक्षण करा. जिथे तणाव जाणवत आहे तो भाग जाणीवपूर्वक शिथिल करा.
हळू चाला आणि प्रत्येक पावलावर तसेच आपल्या सभोवतालच्या वातावरणावर लक्ष केंद्रित करा.
तुमच्या विचारांचे निरीक्षण करा. विचार हे आकाशातील ढग आहेत अशी कल्पना करत त्याकडे फक्त बघा; त्यांच्यावर कोणताही निर्णय न घेता त्यांना पुढे सरकू द्या.
कृतज्ञता व्यक्त करा. दररोज तुम्ही कृतज्ञ असलेल्या तीन गोष्टींचा विचार करा. यामुळे सकारात्मकता वाढते.
जेवण सावकाश करा. प्रत्येक घासाची चव, पोत आणि सुगंध यांचा आस्वाद घेत हळू हळू जेवण करा.
डोळे बंद करा आणि समुद्रकिनारा किंवा जंगल अशा शांत, सुरक्षित जागेची कल्पना करा.
तुमचे विचार आणि भावना ५ ते १० मिनिटे लिहून काढा.