पुढारी वृत्तसेवा
चिंता म्हणजे केवळ विचार नव्हे, तर शारीरिक अवस्था चिंता वाटणे म्हणजे तुमची 'नर्व्हस सिस्टम' सतत सावध (Alert) मोडवर असणे.
तुम्हाला मन शांत करायचे असेल, तर तुमच्या मेंदूला सांगावे लागेल की "सध्या कोणताही धोका नाही." यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.
चिंता वाढली की, हृदयाचे ठोके वाढतात. ते कमी करण्यासाठी श्वास घेण्याची एक खास पद्धत वापरा. दोनवेळा नाकाने श्वास घ्या आणि एकदा तोंडातून सोडा. यामुळे शरीराला लगेच आराम मिळतो.
आपल्या कानाच्या खालून जाणारी एक नस (Vagus Nerve) मनाला शांत करण्याचे काम करते. या भागाला हलका मसाज केल्यास किंवा तिथे लक्ष केंद्रित केल्यास चिंता कमी व्हायला मदत होते.
डोळ्यांना विश्रांती द्या (Tunnel Vision) जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा आपली नजर एकाच गोष्टीवर खिळते. डोळ्यांना शांत ठेवल्यास आणि अधूनमधून लांबवर पाहिल्यास तणाव पातळी कमी होते.
श्वास सोडण्यावर लक्ष द्या : तुम्ही किती हवा आत घेता यापेक्षा ती किती संथपणे बाहेर सोडता (Exhale) हे महत्त्वाचे आहे. ताजी हवा घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे मनासाठी 'रीसेट' बटणासारखे काम करते.
जेव्हा खूप भीती किंवा अस्वस्थता वाटेल, तेव्हा थंड पाण्याचा वापर करा. चेहऱ्यावर थंड पाणी मारल्याने किंवा थंड तापमानामुळे मेंदूचे भीती केंद्र शांत होते.
स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. "मी सुरक्षित आहे" किंवा "ही वेळही निघून जाईल" अशा वाक्यांचा वापर केल्याने मनातील विचारांचा गोंधळ कमी होतो.