Heatstroke: उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी?

Anirudha Sankpal

भरपूर पाणी प्या

शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात वारंवार पाणी आणि ओआरएस, लिंबूपाणी, शहाळे यांसारख्या पेयांचे सेवन करा.

आहारात बदल

ताक, दही, कोशिंबीर, काकडी आणि पाणीदार फळे (कलिंगड, संत्री) यांचा समावेश करा; यामुळे शरीर आतून थंड राहते.

वेळेचे नियोजन

दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक ऊन असते, त्यामुळे या काळात शक्यतो बाहेर जाणे टाळा.

पोशाख

बाहेर पडताना हलक्या रंगाचे, सुती आणि सछिद्र कपडे वापरावेत; सोबत छत्री, टोपी आणि गॉगलचा वापर नक्की करा.

टाळावे असे पदार्थ

चहा, कॉफी, तिखट-मसालेदार पदार्थ, तळलेले अन्न आणि जास्त साखर असलेली सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळा.

विशेष काळजी

लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असलेल्या व्यक्तींना उन्हापासून दूर ठेवा.

त्वचेची स्वच्छता

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा चेहरा आणि डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.

जड जेवण टाळा

उन्हात असताना किंवा दुपारी खूप जड आणि तेलकट जेवण करणे टाळावे, कारण ते पचायला कठीण जाते.

लक्षणांकडे लक्ष द्या

सतत डोकेदुखी, चक्कर येणे किंवा खूप घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात; असे झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

येथे क्लिक करा