पुढारी वृत्तसेवा
शुद्ध तूप म्हणजे पारंपारिक भारतीय घरांची ओळख आहे.
जेवणाची चव वाढवण्यासह या तुपाचे आरोग्यला सुद्धा खूप फायदे आहेत.
तूप हे जीवनसत्त्व A, D, E आणि K ने समृद्ध असते तसेच तुपात अँटिऑक्सिडंट्स सुद्धा मुबलक प्रमाणात असतात.
तूप बनवताना मलाई खूप दिवस काढून ठेवावी लागत असल्याने त्याला एक विशिष्ट वास येऊ लागतो.
अनेकदा पाण्यात धुवूनही लोण्याचा उग्र वास जात नाही. तूप कडवताना तो घरभर पसरतो.
अशावेळी विड्याचे पान किंवा सुपारी/तुळशीचे पान घातल्यास वास निघून जातो.
व्यवस्थित कढवल्यानंतर तुप छान रवाळ व शुद्ध होते, तसेच तुपातील चिकटपणा काही प्रमाणात कमी होतो.