Gatari Amavasya Significance| गटारी/गताहारी अमावस्येचे महत्व आणि अर्थ काय?

पुढारी वृत्तसेवा

गटारी अमावस्या (गताहारी अमावस्या) ही आषाढ महिन्यातील शेवटची अमावस्या म्हणून साजरी केली जाते

या दिवशी भरपूर मांसाहाराचा आस्वाद घेतला जातो

कारण यानंतर लगेचच पवित्र असा श्रावण महिना सुरू होतो.

file photo

संस्कृतमधील 'गत' (संपलेला) आणि 'आहार' या शब्दांवरून हा शब्द आला आहे

पूर्वीचा खानपान मागे सोडून सात्त्विक आहाराकडे वळले जाते, म्हणजेच 'गताहारी' होय

काळानुसार लोकबोलीत याला 'गटारी' म्हटले जाऊ लागले.

श्रावण महिन्यात बहुतांश घरात मांसाहार, मद्यपान वर्ज्य केले जाते

त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वीच्या या शेवटच्या दिवशी मांसाहारी पदार्थ करून खाण्याची पद्धत आहे

या दिवसाला दीप अमावस्याही म्हटले जाते

या दिवशी घरातील सर्व दिवे, समई, कंदील स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते

आषाढ संपून श्रावणातील मांगल्याचे स्वागत करण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर केली जाते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंड (पॅनक्रियाज) कसे सक्रिय ठेवावे?