मंदिरात बनावट सोने-चांदी अर्पण केल्यावर जेल होऊ शकते का? काय आहे कायदा?

पुढारी वृत्तसेवा

मंदिरात नकली सोने-चांदी अर्पण केल्यास काय होईल?

वैष्णोदेवी मंदिरातील कथित बनावट चांदी प्रकरणानंतर हा प्रश्न चर्चेत आला आहे. अशा प्रकरणांवर कायदा काय सांगतो, जाणून घ्या.

बनावट दागिने अर्पण करणे गुन्हा ठरू शकतो

जाणीवपूर्वक नकली सोने किंवा चांदी अस्सल असल्याचे सांगून मंदिरात अर्पण केल्यास तो फसवणुकीचा प्रकार मानला जाऊ शकतो.

कोणत्या कायद्याखाली कारवाई होऊ शकते?

भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक, बनावट वस्तू अस्सल म्हणून सादर करणे आणि कट रचणे यांसारख्या कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो.

जेल आणि दंडाची शक्यता

दोष सिद्ध झाल्यास आरोपीला तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. प्रकरणाच्या स्वरूपानुसार शिक्षा होते.

अनवधानाने नकली दागिने अर्पण केले तर?

श्रद्धाळू स्वतः फसवणुकीचा बळी ठरला असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यास त्याच्यावर कारवाई न होता संबंधित विक्रेत्यावर कारवाई होऊ शकते.

मंदिरांमध्ये तपासणी कशी होते?

तिरुपती, महाकाल, राम मंदिर, वैष्णोदेवी यांसारख्या मोठ्या मंदिरांमध्ये दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी तज्ज्ञ समित्या आणि अधिकृत सोनारांची मदत घेतली जाते.

सीसीटीव्ही आणि नोंदींवर विशेष लक्ष

मंदिरातील दान प्रक्रियेवर सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जाते. दागिन्यांची तपासणी झाल्यानंतरच अधिकृत नोंद केली जाते.

बनावट सोनं कसं तयार केलं जातं?

पीतळ, तांबे, जस्त, अॅल्युमिनियम किंवा टंगस्टन वापरून त्यावर सोन्याचा मुलामा दिला जातो, त्यामुळे ते अस्सल सोन्यासारखे दिसते.

कायदेशीर कारवाई होऊ शकते

मंदिरात अर्पण करताना दागिने विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच खरेदी करा. जाणीवपूर्वक फसवणूक केल्यास कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

Best Monsoon Fruit: पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल तर 'ही' ५ फळे नक्की खा; पचनशक्ती राहील उत्तम!

Best Monsoon Fruit | pudhari
येथे क्लिक करा