Anirudha Sankpal
रोज एकच प्रकारचा नाश्ता केल्याने सकाळच्या धावपळीत सोपे जात असले, तरी त्यामुळे आपल्या पोटावर (आतड्यांवर) मोठा परिणाम होतो.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, योग्य आणि पौष्टिक नाश्ता रोज खाल्ल्यास पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
फायबरयुक्त नाश्ता रोज खाल्ल्याने विशिष्ट चांगल्या जिवाणूंना (बॅक्टेरिया) नियमित अन्न मिळते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य मजबूत होते.
आतड्यांमधील मायक्रोबायोमच्या रचनेत होणारे हे बदल आठवडे नव्हे, तर अवघ्या काही दिवसांतच घडून येतात.
मात्र, हा फायदा हवा असेल तर नाश्त्यामध्ये ओट्स, नट्स, बिया आणि फळांसारख्या विविध प्रकारच्या फायबरचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
याउलट, साखरेचे प्रमाण जास्त असलेले तृणधान्ये किंवा जंक फूड खाल्ल्यास आतड्यांमध्ये जळजळ निर्माण करणारे घातक जिवाणू वाढू शकतात.
आपल्या शरीराच्या जैविक चक्रानुसार (Circadian Rhythm) सकाळचा पहिला आहार हा आतड्यांच्या जिवाणूंसाठी एक अलार्मचे काम करतो.
नाश्ता टाळल्यामुळे शरीराचे हे नैसर्गिक चक्र विस्कळीत होते, त्यामुळे नाश्ता केवळ शरीराला ऊर्जा देणारे साधन नसून आतड्यांसाठी पहिली महत्त्वाची सूचना आहे.