जेवताना पाणी पिणे योग्य की अयोग्य? पिल्यास काय होईल परिणाम

पुढारी वृत्तसेवा

अनेकांना जेवताना मध्ये-मध्ये पाणी पिण्याची सवय असते, पण हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की घातक

आयुर्वेदानुसार, जेवताना जास्त पाणी प्यायल्याने पोटातील 'जठराग्नी' मंदावतो, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही.

जेवताना पाणी प्यायल्याने रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढण्याची शक्यता असते, परिणामी शरीरात चरबी साठू लागते.

पाण्यामुळे पाचक रसांची तीव्रता कमी होते, ज्यामुळे अन्नातील आवश्यक पोषक तत्वे शरीर शोषून घेऊ शकत नाही.

अन्नाचे नीट पचन न झाल्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि पित्त (Acidity) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, जेवणापूर्वी ३० मिनिटे आधी किंवा जेवणानंतर ४५ मिनिटांनी पाणी पिणे सर्वात उत्तम मानले जाते.

जर घास घशात अडकला असेल किंवा खूप तिखट लागल्यास, केवळ एक-दोन घोट कोमट पाणी पिणे चालू शकते.

निरोगी राहण्यासाठी हा नियम पाळा पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवताना पाणी पिणे टाळणे हा एक सोपा मार्ग आहे.

येथे क्लिक करा...