रोज वापरत असलेली पाण्याची बॉटल किती दिवसांनी स्वच्छ करावी?

मोनिका क्षीरसागर

बाटलीमध्ये पाणी साठवल्याने बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजंतू ओलावा व उष्णता यामुळे वेगाने वाढू शकतात.

बाटलीच्या तोंडाला थेट स्पर्श केल्याने तोंडातले जंतू बाटलीच्या आत जातात, ज्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते.

पाण्याच्या बाटलीमध्ये बायोफिल्म (जिवाणूंचे एक थर) तयार होऊ शकतो, जो नियमित स्वच्छता न केल्यास आरोग्य धोक्यात आणतो.

विशेषतः उन्हाळ्यामध्ये किंवा दमट हवामानात, बॅक्टेरियाची वाढ जास्त होते, म्हणून दर १-२ दिवसांनी सखोल स्वच्छता आवश्यक आहे.

बाटली स्वच्छ करण्यासाठी डिश सोप (भांडी घासण्याचा साबण) आणि बॉटल ब्रशचा वापर केल्यास कोपऱ्यातील घाण आणि जंतू प्रभावीपणे काढता येतात.

स्वच्छतेनंतर बाटली पूर्णपणे कोरडी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ओलावा हा जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतो.

आठवड्यातून एकदा तरी व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण वापरून बाटली पूर्णपणे निर्जंतुक करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा...