पुढारी वृत्तसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास ३२ पुस्तके लिहिली.
त्यांचे साहित्य ‘लेखन आणि भाषणे’ या २२ खंडांमध्ये प्रकाशित झाले आहे.
जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे त्यांचे सर्वात प्रभावी पुस्तक. जातिव्यवस्थेवर थेट प्रहार करणारा ग्रंथ.
बुद्ध आणि त्यांचा धम्म हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. धर्म आणि मानवतेचा संदेश देणारे पुस्तक.
रुपयाची समस्या हा भारतीय अर्थव्यवस्थेवर आधारित महत्त्वाचा अभ्यास ग्रंथ. आजही अर्थशास्त्रात संदर्भ म्हणून वापरला जातो.
शूद्र पूर्वी कोण होते? या पुस्तकात इतिहासाचे सखोल विश्लेषण.
‘Thoughts on Pakistan’ मध्ये देशाच्या फाळणीवर अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिलं.
‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ अशी वृत्तपत्रे चालवली. ‘Waiting for a Visa’ ही आत्मकथाही प्रसिद्ध.
५०,००० पेक्षा जास्त पुस्तकांचे वैयक्तिक ग्रंथालय त्यांनी उभे केले. ज्ञानासाठी त्यांची भूक किती मोठी होती हा याचा पुरावा.