Asit Banage
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला याची कारणे आपण थोडक्यात जाणून घेऊयात.
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि प्रज्ञा ही बौद्ध धम्माची मूलभूत तत्त्वे आहेत.
हिंदू धर्मातील जातीयता आणि विषमता यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
दलितांना स्वाभिमानाने जगण्यासाठी पर्यायी मार्गाची गरज होती, म्हणून त्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला.
गौतम बुद्ध यांचा तर्कशुद्ध आणि मानवतावादी मार्ग त्यांना पटला. बौद्ध धर्म हा अंधश्रद्धेपेक्षा विवेक आणि अनुभवावर आधारित आहे म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला. सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांसाठी बौद्ध धम्म उपयुक्त असल्याचे बाबासाहेबांना पटले.
1935 मध्येच "हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" अशी घोषणा बाबासाहेबांनी केली होती. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.