BP Medication Side Effect: BP ची गोळी घेतल्यानं किडनी खराब होते... काय आहे सत्य?

Anirudha Sankpal

अनेकांमध्ये असा गैरसमज असतो की, बीपीची (BP) गोळी सतत घेतल्याने किडनी खराब होते.

परंतु, वास्तव असे आहे की बीपीची गोळी नाही, तर 'अनियंत्रित रक्तदाब' किडनीला जास्त नुकसान पोहोचवतो.

जेव्हा शरीरातील रक्तदाब सतत जास्त राहतो, तेव्हा किडनीतील नाजूक रक्तवाहिन्यांवर प्रचंड ताण येतो.

या सततच्या ताणामुळे हळूहळू किडनीची कार्यक्षमता कमी होते आणि ती निकामी होण्याचा धोका वाढतो.

अनेक रुग्ण स्वतःच्या मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता अचानक बीपीची औषधे बंद करतात, जे अत्यंत धोक्याचे आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बंद केल्याने रक्तदाब अचानक आणि तीव्र गतीने वाढू शकतो.

या अनियंत्रित वाढलेल्या बीपीचा थेट आणि घातक परिणाम किडनी, हृदय, मेंदू आणि डोळ्यांवर होतो.

म्हणूनच, स्वतःच्या मनाने बीपीची गोळी कधीही बंद करू नये आणि निरोगी आरोग्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवर्जून पाळावा.

येथे क्लिक करा