Dehydration| 'डिहायड्रेशन'बाबत शरीर देतेय 'या' ७ धोक्याच्या सूचना, वेळीच व्‍हा सावध!

पुढारी वृत्तसेवा

डिहायड्रेशन (निर्जलीकरण)मुळे शरीरात पाण्याची पातळी खालावते. त्‍यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

जेव्हा शरीरात पाणी कमी असते, तेव्हा किडनी पाणी वाचवण्यासाठी लघवी संकलित (Concentrate) करते. यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा होतो.

तोंडतील लाळेचे प्रमाण कमी झाल्‍याने तोंड कोरडे पडते. मेंदूतील 'हायपोथॅलॅमस' शरीरातील पाणी कमी झाल्याचा संदेश तहानेच्या स्वरूपात देतो.

शरीरात पाणी कमी झाल्यामुळे डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास जाणवतो.

हातावरची त्वचा ओढल्यास ती पूर्ववत न होता तशीच राहिल्यास समजावे की शरीरात पाण्याची तीव्र कमतरता आहे.

डिहायड्रेशनमुळे रक्तातील प्लाझ्माचे प्रमाण कमी झाल्यामुळे तीव्र थकवा जाणवतो.

रक्तदाब संतुलित राखण्यासाठी हृदय वेगाने धडधडू लागते. याला वैद्यकीय भाषेत 'टॅकीकार्डिया' म्हणतात.

घामाद्वारे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स (सोडियम आणि पोटॅशियम) बाहेर पडतात. यांच्या कमतरतेमुळे स्नायू आकुंचन पावतात आणि तीव्र वेदना किंवा पेटके येतात.

दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. डिहायड्रेशनची लक्षणे गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

येथे क्‍लिक करा.