shreya kulkarni
ओम शांती ओम दरम्यान दीपिका आणि रणबीरची जवळीक वाढली; दोघंही नवखे होते, शूटिंगदरम्यान मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं.
रणबीरसाठी मानेवर खास टॅटू करून आपल्या प्रेमाची खूण जपली होती.
दीपिकाने घरच्यांच्या विरोधाला न जुमानता हे नातं टिकवण्याचा प्रयत्न केला.
दोघांचं नातं कशामुळे तुटलं याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
तिला एकटं वाटू नये म्हणून आईचं सतत सहवासात राहणं तिला मानसिक बळ देत होतं.
भावनिकरीत्या ती खूप खचली होती, यावेळी तिच्या आईने तिचा खंबीर आधार दिला.
दीपिका हळूहळू आयुष्यात पुढे जायला लागली आणि रणवीर तिच्या आयुष्यात आला.
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
ब्रेकअपच्या वेदना विसरायला आणि आयुष्यात पुन्हा आनंद मिळवण्यासाठी रणवीर तिच्या सोबत होता.
आज दीपिका आणि रणवीर बॉलिवूडमधील आयडियल कपल आहेत त्यांच्या प्रेमकहाणीने अनेकांना नवा विश्वास आणि प्रेरणा दिली आहे.