पुढारी वृत्तसेवा
दुपारचे जेवण टाळल्याने कॅलरी कमी होण्याऐवजी चयापचय मंदावतो आणि नंतर तीव्र भूक लागते, यामुळे स्नॅक्स किंवा रात्रीचे जेवण हेवी होते
भात, नूडल्स किंवा पराठे यांसारखे कार्बोहायड्रेटयुक्त जेवण रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवते आणि लवकरच ऊर्जा कमी होते व पुन्हा भूक लागते
प्रोटीन नसल्याने शरीरात जास्त चरबी साठते आणि पुन्हा लवकर भूक लागते. त्यामुळे अधिक प्रमाणात खाल्ले जाते
हॉटेलमधील पदार्थांमध्ये जास्त तेल, मीठ, सॉस आणि लपलेली साखर असते, त्यामुळे वारंवार हॉटेलिंग किंवा फास्ट फूड खाणे टाळावे
कोल्ड कॉफी, पॅकेज्ड ज्यूस, सोडा किंवा गोड चहा यांसारखी पेये अनावश्यक कॅलरी आणि साखर वाढवतात
घाईघाईत खाल्ल्यामुळे मेंदूला पोट भरल्याचा सिग्नल वेळेवर मिळत नाही, त्यामुळे जास्त खाल्ले जाते. यामुळे पचनावर परिणाम होऊन पुन्हा भूक लागते
मोठ्या ताटात खाणे, बुफे लंच किंवा सवयीने जास्त खाणे यामुळे शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरी घेतल्या जातात
ग्रॅनोला बार, फ्लेवर्ड दही, रेडी-टू-ईट पदार्थ यासारख्या “हेल्दी” वाटणाऱ्या पॅकेज्ड पदार्थांमध्ये लपलेली साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि रिफाइंड कार्ब्स असतात
हे पदार्थ ऊर्जा पटकन कमी करतात आणि वजन वाढवतात, घरच्या ताज्या आणि पौष्टिक अन्नाच्या तुलनेत ते कमी फायदेशीर असतात