Rahul Shelke
शिवाजी महाराज केवळ महान योद्धा नव्हते, तर कुटुंबवत्सल राजा होते. त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू आजही अनेकांना माहित नाहीत.
महाराजांनी आठ विवाह केले होते – सगुणाबाई, सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई.
१६७४ च्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या चार राण्या हयात होत्या. त्यावेळी पट्टराणी होण्याचा मान सोयराबाईंना मिळाला.
महाराजांना दोन पुत्र होते, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज. राज्याभिषेकाच्या वेळी युवराज म्हणून संभाजी महाराजांची निवड झाली.
संभाजी महाराज अवघे अडीच वर्षांचे असतानाच त्यांच्या आई सईबाईंचे निधन झाले. हा महाराजांच्या कुटुंबासाठी मोठा आघात होता.
पट्टराणी सोयराबाई आणि युवराज संभाजी महाराज यांच्यातील अधिकारांमुळे रायगडावर मतभेद आणि तंटेबखेडे सुरू झाले.
शिवाजी महाराजांना सहा मुली होत्या. सर्व मुलींचे विवाह नामांकित घराण्यांत झाले, मात्र महाराजांचा एकही जावई स्वराज्याच्या लढ्यात सक्रिय सहभागी झाल्याचे आढळत नाही.
महाराजांच्या आई जिजाबाई यांनी आपल्या मुलाचा राज्याभिषेक पाहिला. तो आनंद त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण होता.
आपल्या मुलाला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्या माऊलीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला.
शिवाजी महाराजांचे आयुष्य फक्त युद्धांनी नाही, तर कुटुंबातील आनंद, दुःख आणि त्यागांनीही घडले. स्वराज्याच्या पाठीमागे उभं होतं एक मोठं कुटुंब.
प्र.न. देशपांडे यांनी लिहिलेलं 'छत्रपती शिवाजी महाराज' हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.