Chapati vs Rice: दुपारच्या जेवणात चपाती खावी की भात... काय आहे जास्त फायदेशीर?

Anirudha Sankpal

चपाती आणि भात या दोन्हीमधून शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असणारे कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) सारख्याच प्रमाणात मिळतात.

चपातीमध्ये गव्हातील फायबरचे (Fiber) प्रमाण जास्त असल्याने ती पचायला वेळ घेते आणि शरीरातील रक्तातील साखर हळूहळू वाढते.

चपाती खाल्ल्याने बऱ्याच वेळेस भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि रक्तातील साखर (Diabetes) नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

तांदूळ हा चपातीपेक्षा पचायला अत्यंत हलका असतो, त्यामुळे ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी दुपारच्या जेवणात भात खाणे फायदेशीर ठरते.

भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) जास्त असल्याने तो खाल्ल्यानंतर शरीरातील रक्तातील साखर वेगाने वाढू शकते.

भात खाल्ल्यानंतर शरीरात 'सेरोटोनिन' हार्मोन तयार होतो, ज्यामुळे दुपारच्या वेळी जास्त आळस किंवा सुस्ती येण्याची शक्यता असते.

चपातीमधून शरीराला लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे मिळतात, तर पांढऱ्या भातातून ही पोषक तत्वे तुलनेने कमी मिळतात.

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर भाताऐवजी चपाती किंवा पांढऱ्या भाताऐवजी 'ब्राउन राईस' (Brown Rice) खाणे विज्ञानानुसार योग्य मानले जाते.

चपाती मऊसूत हव्यात... मग पीठ मळताना मिसळा ‘हा’ पदार्थ | File Photo

आरोग्याच्या दृष्टीने दुपारच्या जेवणात चपाती आणि भात या दोन्हीचा मर्यादित प्रमाणात समावेश करणे हा संतुलित आहाराचा (Balanced Diet) उत्तम पर्याय आहे.

येथे क्लिक करा