जर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर उठलात, तर तुम्हाला सौंदर्य, शक्ती, ज्ञान, बुद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते.ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने संपूर्ण दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असतो आणि प्रत्येक कार्यात यशस्वी होण्याची शक्यता वाढते.धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तावर उठून उपासना व पाठ केल्यास प्रार्थना थेट परमात्म्यापर्यंत पोहोचते, असे मानले जाते.ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी व्यायाम, योग केल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते. उच्च ऑक्सिजन पातळी वाढून मेंदूचे कार्य सुधारते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.Brahma Muhurta: प्राचीन काळी ऋषी-मुनी ब्रह्म मुहूर्ताला ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानत असत.धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तावर देवता घरात येतात. यावेळी आपण जागे असल्यास, घरातील सकारात्मकता वाढून आपल्या प्रगतीचा, समृद्धीचा मार्ग खुला होतो.जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तावर उठतो, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते, त्यामुळे मन प्रफुल्लीत, प्रसन्न होते.ब्रह्म मुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास मानला जातो, म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते, पहाटे 4 ते 5:30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात..Premanand Maharaj: देवाचे नाव असलेले वस्त्र परिधान करु की नको ? प्रेमानंद महाराज म्हणतात....लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.