पुढारी वृत्तसेवा
मानवी मेंदु हा जितका किचकट आहे तेवढेच त्यात येणारे विचार सुध्दा किचकट असतात.यांच विचारांमुळे जेव्हा एखादा व्यक्ती एकटा असतो त्याचे विचार त्याला नैराश्याकडे वळवतात.
डायरी लिहणे हा फक्त भावना व्यक्त करण्यासाठी नाहीतर नैराश्य आणि एकटेपणा वरचा सर्वात सोपा उपाय आहे.
नैराश्यामध्ये डायरी लिहण्याने नैराश्य येणाचे कारणं स्पष्ट होतात ज्यामुळे योग्य ते उपचार घेण्यास मदत मिळते.
डायरी लिहण्याच्या अनेक पध्दती आहेत. त्यातल्या काही पध्दती डॉक्टरांनी सुचवलेल्या उपयोगी पध्दती आहेत.
मनातल्या सर्वात खोल आणि कधीही कोणालाही न सांगितलेल्या भावना डायरीत तोपर्यंत लिहायच्या जोपर्यंत मन शांत होत नाही.
आयुष्यात झालेल्या सर्व चांगल्या गोष्टीचे आभार मानण्या साठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता लेखन फायदेशीर ठरते. यामुळे तो व्यक्ती आयुष्याला सकारात्मक दृष्टीने बघायला लागतो.
या पध्दती मध्ये मनावर जबरदस्त प्रभाव पाडणार्या भावना डायरीत उतरवल्याने मानवी मनाला शांतता मिळते.
डायरी लिहण्याची सवय ही रोज किंवा आठवड्यातुन एकदा लिहावी जेणे करुन ती सवय रोजच्या दिनचर्येत रुजु होईल.
सुंदर आणि स्वच्छ लेखानापेक्षा मनातील भावनांवर लक्ष केंद्रीत करण्याची जास्त गरज ठेवावी.
Soap Invetion: 'या' संस्कृती पेक्षा जुना आहे साबन!