Anirudha Sankpal
१. जेवण किंवा पाणी प्यायल्यानंतर
अन्न आणि पाण्यामुळे शरीराचे वजन तात्पुरते वाढते, जे चरबीवाढ दर्शवत नाही.
२. मासिक पाळी दरम्यान
हार्मोन्समुळे शरीरात पाणी साठून राहते (Water Retention), ज्यामुळे २ ते ५ पाउंड वजन जास्त भरू शकते.
३. मद्यपानानंतर
अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन किंवा वॉटर रिटेंशन होते, ज्यामुळे वजनाचा अचूक आकडा समजत नाही.
४. व्यायामानंतर लगेच
घामावाटे पाणी बाहेर पडल्याने शरीर तात्पुरते हलके होते, पण ते कायमस्वरूपी वजन कमी झाल्याचे लक्षण नसते.
५. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी
शरीराचे वजन सकाळपासून रात्रीपर्यंत २ ते ६ पाउंडने बदलत असते, त्यामुळे सकाळीच वजन करणे योग्य ठरते.
६. अति मीठ असलेल्या जेवणानंतर
सोडियममुळे शरीरात पाणी साठते, ज्यामुळे रातोरात वजन वाढल्यासारखे वाटते.
७. जास्त कर्बोदके (Carbs) खाल्यावर
ग्लायकोजेन स्वतःसोबत पाणी साठवून ठेवते, ज्यामुळे वजन ३ ते ६ पाउंड जास्त दिसू शकते.
अचूक वेळ
सकाळी उठल्यावर, प्रसाधनानंतर (Bathroom) आणि काहीही न खाता-पिता केलेले वजन सर्वात अचूक असते.
सावधगिरी
फिटनेस तज्ज्ञ अॅलेक्स यांनी वजन करताना जड कपडे टाळावेत आणि नेहमी एकाच वेळी वजन मोजून आपल्या फिटनेस प्रगतीचा मागोवा घ्यावा असा सल्ला दिला आहे.