Sweet Dish In Ayurveda: जेवणानंतर स्वीट डिश... आयुर्वेदानुसार योग्य की अयोग्य?

Anirudha Sankpal

आयुर्वेदानुसार, जेवणात पदार्थांचा क्रम ठरलेला असतो, जो आरोग्यासाठी औषधाचे काम करतो.

सुश्रुत संहितेनुसार, जेवणाच्या सुरुवातीला मधुर (गोड) रसाचे पदार्थ खाणे हितकारक असते.

गोड पदार्थ पचायला जड असतात, जेवणाच्या सुरुवातीला आपली जठराग्नी प्रबळ असल्याने ते सहज पचतात.

मात्र, पोट भरल्यानंतर मिठाई खाल्ल्याने शरीरात 'कफ' दोष वाढतो आणि पचनसंस्था मंदावते.

जेवणानंतर मिठाई खाल्ल्याने शरीरात जडपणा आणि आळस येतो, जो आरोग्यासाठी पूरक नाही.

शास्त्रात सांगितलेला 'मधुर रस' म्हणजे नैसर्गिक पदार्थ (दूध, खजूर) आहेत, आजची प्रक्रिया केलेली मिठाई नाही.

जेवणाचे रसात्मक संतुलन राखण्यासाठी शेवटी अगदी थोडा गूळ खाणे फायदेशीर ठरू शकते.

मधुमेह किंवा पचनाचे विकार असल्यास कोणताही क्रम अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला नक्की घ्या.

येथे क्लिक करा