पुढारी वृत्तसेवा
कच्च्या आवळ्यात नैसर्गिक व्हिटॅमिन-C सर्वाधिक असते, जे सरबत बनवल्यावर कमी होऊ शकते.
कच्च्या आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरात सूज कमी करतात आणि त्वचा–केसांना फायदा करतात.
बाजारात मिळणाऱ्या आवळा सरबतामध्ये साखर-सोडियम जास्त असते, ज्यामुळे आरोग्याला तोटा होऊ शकतो.
उकळणे, गाळणे या प्रक्रियेमुळे व्हिटॅमिन-C चा काही भाग नष्ट होतो.
कच्च्या आवळ्यात फायबर सरबतापेक्षा जास्त असते, त्यामुळे पचन सुधारते व बद्धकोष्ठता कमी होते.
उन्हाळ्यात पिण्यासाठी आवळा सरबत उत्तम शरीरात पाण्याची कमतरता भरून काढते.
कच्चा आवळा मेटाबॉलिझम वाढवतो; सरबतामध्ये अतिरिक्त साखर असल्यास फायदा कमी होतो.
सरबतातील साखर डायबिटीजसाठी हानिकारक; कच्चा आवळा उत्तम पर्याय.
दोन्ही फायदेशीर असले तरी कच्चा आवळा पौष्टिकदृष्ट्या सरबतापेक्षा जास्त लाभ मिळवून देतो