पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात 'तुरटी' हा एक अत्यंत स्वस्त आणि प्रभावी नैसर्गिक उपाय आहे.
शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात थोडावेळ तुरटीचा खडा फिरवा.
उन्हामुळे येणाऱ्या घामोळ्यांच्या समस्येवर तुरटीचे पाणी लावल्याने त्वरित आराम मिळतो.
चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि पिंपल्स कमी करण्यासाठी तुरटीचा वापर फायदेशीर ठरतो.
पायांना येणारा अति घाम आणि दुर्गंधी रोखण्यासाठी तुरटीच्या पाण्याचा वापर करणे उत्तम.
जखमेतून येणारे रक्त थांबवण्यासाठी आणि जंतू मारण्यासाठी तुरटी 'अँटीसेप्टिक' म्हणून काम करते.
उन्हाळ्यात पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी आजही अनेक घरांमध्ये तुरटीचा वापर केला जातो.
असा हा छोटासा तुरटीचा खडा तुम्हाला उन्हाळ्यातील अनेक त्रासांपासून मुक्त ठेवू शकतो.