पुढारी वृत्तसेवा
जेवणानंतर थोडे चालणे ही पचनसंस्था आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत सोपी आणि प्रभावी सवय आहे
जेवल्यानंतर १० मिनिटे चालल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते
जेवणानंतर चालल्याने स्नायू सक्रिय होऊन इन्सुलिन संवेदनशीलता वाढविते. रक्तातील अधिक ग्लुकोज स्नायूंमध्ये शोषला जातो
जेवणानंतर चालल्याने पचनसंस्था सक्रिय होऊन पोट लवकर रिकामे होते, पचन सुरळीत होते आणि बद्धकोष्ठतेचा धोका कमी होण्यास मदत होते
चालल्याने अन्ननलिकेच्या खालच्या झडपेला (लोअर इसोफेजियल स्फिंक्टर) आधार मिळतो, ही झडप पोटातील आम्ल योग्य ठिकाणी ठेवण्याचे काम करते
जेवणानंतर चालल्याने शरीरातील आहारातील चरबी हाताळण्याची प्रक्रिया सुधारते. रक्तप्रवाहातील चरबी लवकर कमी होते, दाह कमी होतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते
रात्री वारंवार जडपणा, आम्लपित्त किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास रात्रीच्या जेवणानंतर थोडे चालणे फायदेशीर ठरते
चालल्याने पचन सुधारते, पोट फुगणे टाळले जाते आणि शरीर शांत होते. पचनसंस्था तणावमुक्त राहिल्याने मेंदूकडे त्रासदायक संकेत कमी जाऊन शांत झोप लागण्यास मदत होते
शरीराला कार्बोहायड्रेट्स अधिक संतुलित आणि आरोग्यदायी पद्धतीने हाताळण्यास मदत करते