Latest

पिकाची उगवणशक्‍ती वाढविण्यासाठी काय करावे? जाणून घ्या अधिक

सोनाली जाधव
  • सर्व डाळींपेक्षा उडदामध्ये फॉस्फरीक आम्लाचे प्रमाण अधिक असते.
  • हरभर्‍याच्या कोवळ्या पानात मॅलिक आम्ल आणि ऑक्झॅलिक आम्ल असते.
  • तिळास तेलबियांची राणी असे संबधतात.
  • अंबाडी हे एक तंतुमय पीक असून या पिकाचा उपयोग चटया, दोर, पिशव्या, मासे पकडण्याची जाळी यासाठी केली जातो.
  • ज्यूटला सुवर्णतंत असेही म्हणतात. कारण त्यापासून सर्वात जास्त परकीय चलन मिळते.
  • शुगरबीट हे जगातील दुसरे मुख्य साखरवर्गीय पीक आहे.
  • भारत हा हळदीचे उत्पादन करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन
  • एकट्या भारतात होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत हळद लागवड जास्त प्रमाणात आहे.
  • आले पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र केरळ राज्यात आहे. आल्यातील जिंजेरॉल या घटकामुळे आले तिखट लागते. भारतीय आल्यात 2.5 टक्के तेल असते.
  • टॅपिओका कंदावर प्रक्रिया करून स्टार्च तयार करतात आणि स्टार्चपासून साबुदाणा, नायलॉन पोहे, ग्लुकोज आणि अल्कोहोल तयार करतात.
  • मक्यामध्ये 3-7 टक्के एवढे तेलाचे प्रमाण असते. हे तेल हृदयरोगावर आशादायक उपचार म्हणून पुढे येत आहे.
  • भात हे जगातील सर्वात महत्त्वाचे तृणधान्य पीक असून 60 टक्के लोकांचे मुख्य अन्‍न आहे. गव्हाच्या पिठामधील प्रथिनांमध्ये असलेल्या
  • ग्लुटेन आणि लायसिन यामुळे ब्रेड वजनाने हलका आणि सच्छिद्र होण्यास मदत होते.
  • गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन पंजाबमध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे पंजाबला गव्हाचे कोठार असे म्हणतात.
  • सोडाखार मिश्रण पद्धत आणि मलबारी पद्धत या सुंठ तयार करण्याच्या पद्धती आहेत.
  • कांदा बिजोउत्पादनासाठी कांद्याची लागवड ऑक्टोबर शेवट ते नोव्हेंबर पहिला आठवडा या कालावधीत केली असता जास्तीत जास्त बियाणे मिळते.
  • पिकाची उगवणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि पिके कीड आणि रोगमुक्‍त ठेवण्यासाठी बी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
  • सुरती जातीच्या म्हशीची शिंगे कोयत्याच्या आकाराची असतात.
  • वराहाची मादी एका वेळी सरासरी 10 ते 12 पिलांना जन्म देते.
  • अतिपक्‍व फळात पेक्टीनचे प्रमाण कमी असते म्हणून जेलीसाठी अपरिपक्‍व फळे वापरू नयेत.
  • म्हशीच्या दुधात स्निग्धांश गाईच्या दुधापेक्षा जास्त असल्यामुळे म्हशीच्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व जास्त असते.
  • धान्यास मोकळी हवा लागून धान्याचे तापमान कमी राखण्यासाठी धान्याच्या पोत्यांच्या थप्पी भिंतीपासून 60 सेंटीमीटर अंतरावर असाव्यात.

– जयदीप नार्वेकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT