file photo  
Latest

आजपासून चार दिवस अतिवृष्टी; पुण्यासह सातारा, रायगड, रत्नागिरीला आज ‘रेड अलर्ट’

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बंगालच्या उपसागरासह ओडिशा व आंध्र प्रदेश किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांना एनडीआरएफच्या टीम सज्ज ठेवण्याचा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात सोमवार ते गुरुवारपर्यंत चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात रविवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वार्‍याचा वेग ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने वाढला आहे. हा कमी दाबाचा पट्टा ओडिशासह आंध्र प्रदेश किनारपट्टीवरही सक्रिय आहे.

त्याचे आगामी 48 तासांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होत आहे. त्यामुळे सोमवार ते गुरुवारपर्यंत महाराष्ट्रासह अंदमान-निकोबार बेट, प. बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, पुद्दुचेरी, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, तेलंगण, मध्य प्रदेशसह 12 राज्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम सज्ज ठेवण्याची सूचनाही देण्यात आली आहे. या चार दिवसांत या सर्व राज्यांत 150 ते 200 मि.मी. पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रासह 12 राज्यांना एनडीआरएफ टीम सज्ज ठेवण्याची सूचना 11 ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात धो-धो 14 जिल्ह्यांना 9 ते 11 पर्यंत 'ऑरेंज अलर्ट' बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT