विश्वसंचार

चाळिशीत लोक असतात नाखूश!

Arun Patil

लंडन : संशोधकांनी म्हटले आहे की चाळिशीत आल्यानंतर लोक बहुतांश वेळा नाखूश राहू लागतात. त्यामध्येही महिलांचा समावेश अधिक असतो. त्यांना जुन्या गोष्टी आठवू लागतात आणि भविष्याची चिंता सतावू लागते. कौटुंबिक जीवनातील ताणतणाव व कामाचा ताण यामुळे या वयोगटातील लोक आनंदी नसतात. 400 हून अधिक संशोधनात याविषयीचा दावा करण्यात आला आहे.

132 देशांच्या हॅपिनेस कर्व्हच्या डेटामध्ये या वयाचा परिणाम शिक्षण, वैवाहिक जीवन व रोजगाराची स्थिती यावर परिणाम करणारा ठरतो, हे लक्षात आले. विकसनशील देशांच्या द़ृष्टीने सर्वात कमी आनंद 48.2 वर्षे या वयात वाटू लागतो. शरीराची ऊर्जेची पातळी घटते. अर्थशास्त्रज्ञ व हॅपिनेस विषयाचे तज्ज्ञ कॅरल ग्रॅहम यांच्या म्हणण्यानुसार 34 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांकडे दोन दशकांमधील कठीण काळाचा अनुभव असतो. 2021 च्या डेटानुसार या वयोगटातील लोकांचा बहुतांश वेळ क्रीडा, अभ्यास व इतर घडामोडींऐवजी टीव्हीसमोर जास्त जातो. ते तरुणांच्या तुलनेत कमी व्यायाम करतात. त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे या वयोगटातील लोकांनी आरोग्याच्या द़ृष्टीने स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT