महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक म्हणजे ‘गुढीपाडवा’. नवीन हिंदू वर्षाची सुरुवात आणि चैत्र नवरात्राचा प्रारंभ ‘गुढीपाडवा’ या दिवसापासून होते. गुढीपाडव्याला प्रसाद म्हणून कडुनिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. त्याचे धार्मिक महत्त्व असले, तरी तुम्ही कडुनिंब आणि गूळ खाण्याचे आरोग्यविषयक फायदेदेखील जाणून घेऊ शकता...
जर तुम्ही नियमितपणे कडुनिंबाचे सेवन केले, तर त्याचे अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुणधर्म शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. रक्त शुद्ध केल्याने अनेक आजारांचा धोका टळतो.
कडुनिंब आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात अनेकदा मुरुम, एक्झिमा आणि सोरायसिसची समस्या उद्भवते, ज्यासाठी कडुनिंबाचा वापर या समस्यांपासून आराम देण्याचे काम करतो.
कडुनिंबाचे सेवन पोटासाठी किंवा पचनासाठी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते.
कडुनिंबाचे सेवन केल्याने मधुमेहातही आराम मिळतो. कडुनिंबाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
कडुनिंबाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, त्यामुळे अनेक आजारांशी लढण्यास मदत होते.
कडुनिंबाव्यतिरिक्त गूळदेखील खाल्ला जातो. त्याचे फायदेदेखील आहेत, जे फार कमी लोकांना माहिती आहेत. गूळ हा लोहाचा चांगला स्रोत मानला जातो. तुम्ही ते सतत किंवा नियमितपणे सेवन केले, तर तुम्हाला अशक्तपणाच्या समस्येपासून आराम मिळतो.
गुळाचे सेवन केल्याने तुमची पचनसंस्था सुधारते आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
कडुनिंबाप्रमाणेच गुळाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारादेखील म्हटले जाते, जे अनेक आरोग्य समस्यांशी लढण्यास मदत करते.
हाडे मजबूत करण्यासाठी गूळ हा सर्वोत्तम सुपरफूड मानला जातो. खरं तर, गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडे मजबूत करते.
शरीरातील ऊर्जेची पातळी राखण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेटस् शरीराला ऊर्जा प्रदान करतात.