नवी दिल्ली : आजच्या धावपळीच्या जीवनात, आपले डोळे सतत मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि टॅब्लेटच्या स्क्रीनशी जोडलेले असतात, ज्यामुळे लहान वयातच द़ृष्टी कमी होणे ही समस्या सामान्य झाली आहे. जर तुम्हीही डोळ्यांची कमी होणारी द़ृष्टी अनुभवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ‘व्हिटॅमिन ए’ किंवा ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे द़ृष्टी मंदावते.
तुम्हाला कधी असे जाणवले आहे का, की तुमचे डोळे लवकर थकून जातात किंवा रात्री धुसर दिसू लागले आहे? ही लक्षणे अनेकदा सतत स्क्रीन पाहणे, अपुरी झोप आणि चुकीच्या आहारामुळे दिसतात; परंतु जर हे दीर्घकाळ टिकले तर सावध होण्याची गरज आहे. डोळ्यांच्या द़ृष्टीसाठी काही जीवनसत्त्वे अत्यंत आवश्यक असतात. जेव्हा शरीरात त्यांची कमतरता होते, तेव्हा द़ृष्टी कमी होऊ लागते. यापैकीच एक आहे ‘व्हिटॅमिन ए’, शरीरात याची कमतरता झाल्यास व्यक्ती अंधत्वाच्या आजाराने पीडित होऊ शकते.
जेव्हा एखाद्याला रात्रीच्या वेळी पाहण्यात अडचण येते (रातांधळेपणा), तेव्हा ती ‘व्हिटॅमिन ए’ची कमतरता असू शकते. जर तुमच्या चष्म्याचा नंबर सतत वाढत असेल, तर काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात ‘व्हिटॅमिन ए’ची कमतरता निर्माण करते, ज्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो. ‘व्हिटॅमिन ए’च्या कमतरतेमुळे कॉर्निया गरजेपेक्षा जास्त कोरडा होतो, ज्यामुळे डोळ्यांसमोर धुसर थर तयार होऊ लागतो. यामुळे दिसणे कमी होते. डोळ्यांसाठी ‘व्हिटॅमिन ए’ अगदी एखाद्या इंजिनला चालवण्यासाठी इंधन किंवा पेट्रोलची गरज असते, तसेच आहे.
हे जीवनसत्त्व कॉर्नियाला निरोगी ठेवते आणि डोळे कोरडे पडणे थांबवते. रात्रीच्या द़ृष्टीसाठी आवश्यक असलेले रोडोप्सीन नावाचे प्रथिन बनवण्यात ते मदत करते. ‘व्हिटॅमिन ए’च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा आणि झेरोफथाल्मिया सारखे आजार होऊ शकतात, जे अंधत्वाकडे घेऊन जाऊ शकतात. ‘व्हिटॅमिन ए’ची कमतरता पूर्ण करण्याचे अनेक मार्ग आहेत; परंतु जर तुमचा आहार योग्य असेल तर ही कमतरता कधीच येणार नाही. गाजर, रताळे, भोपळा , हिरव्या पालेभाज्या (उदा. पालक) आणि लाल शिमला मिरची अशा भाज्या ‘व्हिटॅमिन ए’चा उत्तम स्रोत असतात. तसेच आंबा, पपई, जर्दाळू , टरबूज आणि खरबुजा यामधूनही हे जीवनसत्त्व मिळते. दूध, अंडी आणि मासे यांच्या सेवनानेही ‘व्हिटॅमिन ए’ मिळते.