तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना करू नका या चुका Pudhari File Photo
विश्वसंचार

तांब्याच्या भांड्यात पाणी पिताना करू नका या चुका

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, हे सर्वांनाच माहिती आहे. ते पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि शरीराला विषमुक्त करण्यास मदत करते. पाणी पिताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली नाही, तर ते फायद्याऐवजी नुकसान करू शकते. फिटनेस तज्ज्ञ ल्यूक कौटिन्हो यांनी असेही सांगितले आहे की, तांब्याचे पाणी पिताना लोक काही सामान्य चुका करतात आणि या चुका नुकसान करू शकतात.

पहिली चूक म्हणजे, काही लोक तांब्याच्या भांड्यात गरम पाणी किंवा लिंबाचा रस ठेवतात. हे अजिबात करू नये. कारण, तांबे गरम पाण्याशी आणि लिंबूसारख्या आम्लयुक्त पदार्थांशी प्रतिक्रिया देते. शरीरावर पोटदुखी, गॅस, उलट्या किंवा जळजळ यासारखे वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून तांब्याच्या भांड्यात फक्त सामान्य तापमानाचे पाणी ठेवावे आणि त्यात लिंबू, मध किंवा इतर कोणतेही आम्लयुक्त पदार्थ घालू नये. दुसरी मोठी चूक म्हणजे, काही लोक दिवसभर तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी पितात. हे देखील योग्य नाही.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी फक्त एक किंवा दोन ग्लास तांब्याचे पाणी पिणे फायदेशीर आहे. तांब्याचे भांडे व्यवस्थित स्वच्छ करावे. बरेच लोक ते वारंवार न धुता त्यात पाणी भरत राहतात, ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. तांब्याच्या भांड्यात जास्त वेळ पाणी ठेवू नये. साधारणपणे रात्री पाणी भरून सकाळी ते पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे, पण जर तुम्ही तेच पाणी 24 तास किंवा त्याहून अधिक काळ त्याच भांड्यात ठेवले, तर ते हानिकारक ठरू शकते. योग्य पद्धत अवलंबल्याने ते तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. परंतु, निष्काळजीपणामुळे तेच पाणी तुम्हाला आजारीदेखील बनवू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT