उन्हाळा आला की कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, नारळपाणी, नाचणीची आंबील वगैरे थंडावा देणार्या पेयांची रेलचेल सुरू होते. त्याचप्रमाणे कलिंगड आणि काकड्याही हटकून आपल्या आहारात समाविष्ट होत असतात. उन्हाळ्याच्या सुपरफूडस्ची यादी काकडीशिवाय अपूर्णच आहे. काकडीत सुमारे 96 टक्के पाणी असते, जे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते. हे ताजेपणा देते आणि आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. काकडीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि पचनसंस्था मजबूत होते. काकडी उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून संरक्षण करते. हे कमी कॅलरीज असलेले अन्न आहे. म्हणून, वजन व्यवस्थापनातही मदत होते. त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंटस् त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. काकडी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास देखील मदत करते.
दररोज किमान 7-8 ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामुळे पचनक्रिया, सांधेदुखी, मूत्रपिंडाचे कार्य, स्मरणशक्ती आणि शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. जर खूप उष्णता असेल किंवा कोणी पुरेसे पाणी पीत नसेल तर काकडी हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यात 96 टक्के पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. ते सॅलड म्हणून खाऊ शकता.
काकडीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. काकडी खाल्ल्याने हाडांची ताकद वाढते आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.
काकडीत असलेले पाणी आणि फायबर पचनक्रियेला मदत करतात. हे अन्नाचे योग्य पचन आणि पोषक तत्त्वांचे शोषण करण्यास मदत करते. फायबर बद्धकोष्ठता रोखण्यासाठी आणि पोट स्वच्छ ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात उच्च पौष्टिक मूल्य असते. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
काकडीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्याचा ग्लायसेमिक भार देखील कमी आहे. म्हणून, काकडी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. याशिवाय, काकडीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंटस् मधुमेहामुळे होणार्या गुंतागुंतीपासून देखील संरक्षण करतात.
काकडीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामध्ये असलेले फायबर आणि क्युकरबिटासिन बी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि धमन्यांमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होतो.
काकडीमध्ये क्युकरबिटासिन बी (र्उीइ) नावाचे संयुग असते. यामुळे यकृत, स्तन, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो. हे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास आणि नष्ट करण्यास देखील मदत करू शकते. काकडीच्या सालीमध्येही कर्करोग रोखणारे घटक असतात. त्यामुळे काकडी सोलून न काढता खाणे अधिक फायदेशीर आहे. दररोज 1 ते 2 मध्यम आकाराच्या काकड्या खाणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
1. जास्त काकडी खाल्ल्याने पोटात गॅस, वेदना किंवा अपचन होऊ शकते कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. 2. काकडीमध्ये व्हिटॅमिन के भरपूर असते. त्यामुळे रक्त गोठण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर जास्त काकडी खाऊ नका. 3. काकडीमध्ये पोटॅशियम असते, जास्त काकडी खाल्ल्याने प्रीकॅलेमिया होऊ शकतो. जर आधीच किडनीची समस्या असेल तर किडनी निकामी होण्याचा धोका असू शकतो.4. काही लोकांना काकडीची अॅलर्जी असू शकते, ज्यामुळे खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.