Uncategorized

मलिक यांच्यासाठी मुश्रीफ यांच्या मुंबई फेर्‍या होत्या का? : समरजितसिंह घाटगे

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शाहू समाधीसाठी आलेला निधी रद्द केल्याचा आदेश दाखवा, त्यानंतरच त्यावर बोलू, असे सांगत आमदार हसन मुश्रीफ नवाब मलिक यांना सोडवण्यासाठी मुंबईच्या फेर्‍या मारत होते का, असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शुक्रवारी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आ. मुश्रीफ आणि आ. पाटील यांच्यावर तोफ डागली.

घाटगे आमदारकीसाठी मुंबईला खेटे मारत होते, या मुश्रीफ यांच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले, होय मी मुंबईला फेर्‍या मारल्या पण, यांनी जे पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून ठेवले होते, ते कमी करण्यासाठी आपण मुंबईला फेर्‍या मारल्या होत्या. दाऊद या दहशतवाद्यची बहीण असलेल्या हसीना पारकर यांना पैसे देणारे नवाब मलिक अटकेत आहेत. या मलिकांना सोडवण्यासाठी मुश्रीफ फेर्‍या मारत होते का? असे सवालही घाटगे यांनी केले.

ज्यांनी आणीबाणी लागू केली, त्यानी लोकशाहीची भाषा करणे हास्यास्पद आहे, असे म्हणत यापूर्वीच्या सरकारने लोकशाहीच्या मार्गाने काम केेले असते तर त्यांची कोर्टात प्रकरणे वाढली नसती, असे ते म्हणाले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT