Uncategorized

…अखेर बार्शी वन विभागाला आली जाग

backup backup

बार्शी : पुढारी वृत्तसेवा बार्शी तालुक्यातील अनेक पाणवठ्यात ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्याने वन्यजीवांचा जीव धोक्यात आले होते. याबाबत दैनिक पुढारीमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बार्शी तालुक्याच्या वन विभागाला जाग आली. तालुक्यातील अनेक पाणस्थल (पानवठे) टँकरने पाणी टाकुन भरूण घेण्यात आले आहेत. यानंतर वन्य प्रेमीमधुन दै. 'पुढारी'चे आभार मानले जात आहेत.

उन्हाळा अंतिम टप्प्यात आल्याने बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील जंगलामधील नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र संपत आल्यामुळे वन्य प्राण्यांसाठी पानवठ्यात पाणी टाकणे गरजेचे असल्याबाबत नुकतेच पुढारीत सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. बार्शी वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून पांगरी भागातील उक्कडगांव, चिंचोली व घोळवेवाडी येथील वनक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी पाणस्थल (पानवठे) निर्माण केले होते.

मात्र, ते कोरडे ठाक पडलेले होते. त्यामध्ये टॅकरणे पाणी आणुन सोडणे गरजेचे होते. पाणस्थलामुळे परिसरातील जंगलात असलेल्या जंगली प्राण्यांसह पशु, पक्षी यांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवणे गरजेचे असल्याचे व पानवठ्यात पाणी सोडल्यास जंगली भागातच पाणी उपलब्ध झाल्यास जंगली प्राणी जंगलातच थांबणार तसेच परिणामी शेतकर्‍यांच्या होणार्‍या शेती पिकाच्या नुकसानीत अल्पशी का होईना घट निर्माण होऊ शकते, हा मुद्दा पुढारीने प्रकर्षांने पुढे आणला होता. त्याला काही प्रमाणत यश आल्याच दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT