Uncategorized

तर कधीच पक्ष सोडला असता : प्रणिती शिंदे

Pudhari News

सोलापूर : प्रतिनिधी

मी पदासाठी कधीच राजकारण केलं नाही. मला सत्ता आणि पदाची लालसा असती तर मी काँग्रेस पक्ष कधीच सोडला असता. केवळ जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात आहे, असे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.     

अक्कलकोट रोडवरील रमणनगर येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. शहर मध्यच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी पुन्हा शहर मध्यमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रणिती यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली आहे. 

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, सुशीलकुमार शिंदे यांनी शहरासाठी अनेक विकासाची कामे केली. उजनी-सोलापूर जलवाहिनीची योजना त्यांनीच आणली. त्यामुळे शहरासाठी पाण्याची सोय झाली. पण आता परिस्थिती वेगळीच आहे. उजनीत मुबलक पाणीसाठा असूनही शहराला सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भाजपची सत्ता आल्यापासून हद्दवाढ भागाचा विकास रखडला आहे. केंद्र, राज्य व मनपात सत्ता असूनही विकास कामे होत नाहीत. सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. 

SCROLL FOR NEXT