Latest

Talathi Exam : तलाठ्यांच्या ५६ जागांसाठी ४९ हजार उमेदवार,जिल्ह्यातील आठ केंद्रांवर परीक्षा; १९ दिवस सुरू राहणार परीक्षा

सोनाली जाधव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा :

जिल्ह्यातील तलाठ्यांच्या रिक्त ५६ जागांसाठी तब्बल ४९ हजार १८५ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. या पदांसाठी गुरुवारपासून जिल्ह्यातील आठ -केंद्रांवर परीक्षा सुरू झाल्या आहेत. तब्बल १९ दिवस) ही परीक्षा सुरू राहणार आहे. (Talathi Exam)

राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षेला आज प्रारंभ झाला. यामध्ये जिल्ह्यातही आठ केंद्रांवर दररोज तीन सत्रांत परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या कालावधीपूर्वी अगोदर तीन दिवस संबंधित उमेदवाराला परीक्षेचे रिसीट उपलब्ध होणार आहे.

२२ पथके तैनात

या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने २२ पथके तैनात केली आहेत. दररोज आठ तहसीलदार निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. याखेरीज एक नायब तहसीलदार, एक अव्वल कारकून आणि एक शिपाई यांचाही या पथकात समावेश करण्यात आला आहे. दररोज आठ तहसीलदार निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. याखेरीज एक नायब तहसीलदार, एक अव्वल कारकून आणि एक शिपाई यांचाही या पथकात समावेश करण्यात आला आहे.  कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही, तसेच परीक्षा सुरळीत पार पडेल, याची या पथकावर प्रामुख्याने जबाबदारी राहणार आहे. दैनंदिन कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

या केंद्रांवर होणार परीक्षा

जे. जे. मगदूम महाविद्यालय, जयसिंगपूर, डी.के.टी.ई. इचलकरंजी, तात्यासाहेब कोरे महाविद्यालय, वारणानगर, संजीवन महाविद्यालय, पन्हाळा, विकासवाडी, शिये, सायबर व न्यू पॉलेटेक्निक, उचगाव या आठ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर

सर्व परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर बसविण्यात आले आहेत. याखेरीज प्रत्येक केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असून त्याद्वारे उमेदवारांवर लक्ष ठेवले जाणार आहे. याखेरीज प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT