मोक्‍याच्‍या क्षणी खेळावरील आपली पकड सोडत सामना गमावत असल्‍याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ हा 'चॉकर्स' असे बिरुद मिरवत आला आहे.  
स्पोर्ट्स

T20 WC Final : दक्षिण आफ्रिकेने 'चोकर्स' बिरुद राखले कायम!

पुढारी वृत्तसेवा

मोक्‍याच्‍या क्षणी खेळावरील आपली पकड सोडत सामना गमावत असल्‍याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ हा 'चॉकर्स' असे बिरुद मिरवत आला आहे. आयसीसी स्‍पर्धेत हा संघ आतापर्यंत तब्‍बल आठ वेळा उपांत्य फेरीतच गारद झाला आहे . आज टी20 विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यातही दक्षिण आफ्रिका संघाने मोक्‍याची क्षणी नांगी टाकली आणि आपलं चोकर्स हे बिरुद कायम राखलं.

मोक्‍याच्‍या क्षणी हातात असणारा सामना गमावत असल्‍याने या संघाला हे बिरुद चिकटले होते. आज अंतिम सामन्‍यातही हे बिरुद कायम राहिले.

दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्‍बल आठवेळा उपांत्य फेरीतच गारद

दक्षिण आफ्रिका संघाने आजवर केवळ एकच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) स्‍पर्धा जिंकली होती. यामध्‍ये १९९८ मधील चॅम्पियन्स करंडक तेव्हाची ICC नॉक-आउट टूर्नामेंट स्पर्धेचा समावेश आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने प्रथमच क्रिकेटच्या कोणत्याही प्रारूपातील विश्वचषक स्पर्धेच्‍या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारली होती. वनडे आणि T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ तब्‍बल आठवेळा उपांत्य फेरीतच गारद झाला होता. त्‍यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर चॉकर्स या शिक्‍का बसला होता. मोक्‍याच्‍या क्षणी हातात असणारा सामना गमावत असल्‍याने या संघाला हे बिरुद चिकटले होते. आज अंतिम सामन्‍यातही हे बिरुद कायम राहिले.

टीम इंडियाची स्‍वप्‍नवत कामगिरी

टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात प्रथम फलंदाजी करताना भारताच्‍या डावाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाने केवळ ३४ धावांमध्‍ये कर्णधार रोहित (9), ऋषभ पंत (0) आणि सूर्यकुमार (3) यांच्या विकेट्स गमावल्या. भारतीय संघाला कठीण परिस्थितीत एका संयमी खेळीची गरज होती. विराटने ही गरज ओळखली. त्‍याने अक्षर पटेलच्या साथीने 54 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीच्या 76 धावा आणि अक्षर पटेलच्या 47 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने 20 षटकात 7 विकेट गमावत 176 धावा केल्या. विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्‍याचा पाठलाग करताना 16 षटकांत दक्षिण आफ्रिकेने चार गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मिलर आणि क्लासेन क्रीजवर होते. सामना दक्षिण आफ्रिकेकडे पूर्णपणे झुकल्‍याचे चित्र होते.

भारताने 17व्या षटकात सामन्याचे चित्र बदलले, द, आफ्रिकेची मोक्‍याची क्षणी हाराकिरी

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या २४ चेंडूत २६ धावांची गरज होती. यानंतर १७व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद करत केवळ चार धावा दिल्या. १८व्या षटकात बुमराहने यानसेनला बाद करत दोन धावा दिल्या. अर्शदीपने १९व्या षटकात चार धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर मिलरला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजांनी चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले. दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत आठ गडी गमावून 169 धावा करता आल्या. 16 व्‍या षटकापर्यंत सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्‍या हातात होता. मात्र फलंदाजांनी मोक्‍याची क्षणी अवसानघातकी फटके मारत आपल्‍या संघाला 'चोकर्स' बिरुद का चिकटले आहे हेच दाखवून दिले.

अंतिम सामन्‍यातील विजयासह भारताने 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. भारताने यापूर्वी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे. 13 वर्षांनंतर कोणीही विश्वचषक जिंकू शकलेले नाही. 2011 मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT