विरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती हे एकमेकांपासून वेगळे राहणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. Virendar Sehwag Instagram
स्पोर्ट्स

टीम इंडियाचा 'हा' स्फोटक फलंदाजही घेणार डिवोर्स? दोघांनीही केले एकमेकांना अनफॉलो!

virender sehwag| 21 वर्षे सोबत राहिल्यानंतर घेतला निर्णय

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटपटू वैयक्तिक आयुष्यांच्या गोष्टींमुळे चांगलेच चर्चेत आहेत. हार्दिक पांड्याचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या सतत येत आहेत. आता माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागबद्दलही असाच एक मोठा दावा केला जात आहे. एका वृत्तानुसार, सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांचे जवळपास 21 वर्षांचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.

virender sehwag|  दोघांमधील अंतर वाढले

वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांचे लग्न 2004 मध्ये झाले होते. आता जवळजवळ 21 वर्षांनंतर त्यांचे नाते तुटत चालले आहे असे दिसते. दोघांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. सेहवागच्या अलीकडील पोस्ट आणि अपडेट्समध्येही त्याच्या पत्नीसोबतचा कोणताही फोटो नाही. दिवाळीच्या दिवशीही त्याने फक्त त्याच्या मुलांसोबत आणि आईसोबतचे फोटो पोस्ट केले होते, तर त्याची पत्नी दिसली नव्हती.

मिळालेल्या वृत्तानुसार, सेहवाग आणि त्याची पत्नी आरती गेल्या काही काळापासून वेगळे राहत आहेत आणि लवकरच त्यांचा घटस्फोट होण्याची शक्यता आहे. सेहवाग आणि आरती यांना दोन मुले आहेत - आर्यवीर आणि वेदांत. त्यांचे दोन्ही मुलगेही क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. इतक्या वर्षात त्यांच्या नात्याबद्दल कधीच कोणतीही बातमी आली नाही आणि दोघेही अनेकदा एकत्र दिसले, परंतु अहवालात असे म्हटले आहे की काही काळापासून या नात्यात तणाव होता, ज्यामुळे दोघेही आता वेगळे झाले आहेत. असे होताना दिसते.

virender sehwag|  कुटुंब तयार नव्हते, मग असे झाले लग्न

1999 मध्ये टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने एप्रिल 2004 मध्ये आरती अहलावतशी लग्न केले. हा दोघांचा प्रेमविवाह होता, ज्याबद्दल कुटुंबियांचे एकमत नव्हते. याचे कारण दोन्ही कुटुंबांमधील दूरचे नाते होते. तथापि, कसा तरी दोघांनीही त्यांच्या कुटुंबियांना लग्नासाठी राजी केले आणि नंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. या लग्नाची बरीच चर्चा झाली. त्याचे लग्न पाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे झालेल्या त्रिशतकाच्या एका महिन्याच्या आत झाले, ज्यामुळे त्याकडे बरेच लक्ष वेधले गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT