निवृत्तीच्या अफवांबद्दल रोहित शर्माने पत्रकार परिषदेच्या माध्यामातून सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. Pudhari Photo
स्पोर्ट्स

"मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत नाही, अफवा पसरवू नका" - रोहित शर्मा

Rohit Sharma | कर्णधाराने रोहितचे टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : रविवारी (दि.10) न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यानंतर विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "अंतिम सामन्यात विजय मिळवणे ही खूप चांगली भावना आहे." ७६ धावांची खेळी करून सामनावीर ठरलेल्या रोहितने सामना संपल्यानंतर त्याच्या निवृत्तीबाबतच्या अफवांवरही प्रतिक्रिया दिली.

Rohit Sharma | कृपया अफवा पसरवू नका

यावेळी बोलताना तो म्हणाला, "मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही. कृपया अफवा पसरवू नका." पत्रकार परिषदेत जेव्हा त्याला निवृत्तीबाबत विचारण्यात आले, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, "भविष्यातील कोणतेही नियोजन नाही. सध्या जे घडत आहे, ते चालूच राहील." भारतीय संघाच्या या विजयानंतर चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार खेळ करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवले.

रोहितने केले अफवांचे खंडन

गेल्या काही काळापासून पहिल्या चेंडूपासून आक्रमक क्रिकेट खेळणाऱ्या कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा अशा वेळी चांगली फलंदाजी केली जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती. तथापि, याआधी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटने चांगली कामगिरी न केल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याच्या निवृत्तीबद्दल अटकळ होती. आता त्याने सर्व वृत्तांचे खंडन केले आहे.

Rohit Sharma | अंतिम सामन्यात ठरला रोहित सामनावीर

या ऐतिहासिक विजयामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माची आक्रमक खेळी महत्त्वाची ठरली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच रोहितने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकत चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. त्याने केवळ ४२ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत भारतीय संघाला मजबूत सुरुवात करून दिली. रोहितने एकूण ७६ धावा करत त्याच्या खेळीत ९ चौकार आणि ३ जोरदार षटकार ठोकले. त्याच्या या शानदार प्रदर्शनामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. निर्णायक सामन्यात कर्णधाराने दिलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारतीय संघ विजयी झाला आणि चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. विजयाच्या आनंदात रोहित म्हणाला, "अंतिम सामन्यात असे खेळणे खास असते. संघासाठी माझे योगदान महत्त्वाचे ठरले, याचा मला अभिमान आहे."

रोहितच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाला. रोहितने त्याच्या फलंदाजीनंतर कर्णधारपदाच्या माध्यमातून टीम इंडियासाठी आखलेली यशाची रेषा येत्या काळात आणखी लांबत जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT