पहिल्या टी-20 मध्ये भारताचा विजय  BCCI 'X' Handle
स्पोर्ट्स

IND vs SL : भारताच्या यंग ब्रिगेडने उडवला श्रीलंकेचा धुव्वा

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंका येथे सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 213 धावा चोपल्या. यामध्ये सर्वाधिक धावा कर्णधार सुर्यकुमार यादवने केल्या. त्याने 26 चेंडूत 28 धावा कुटल्या. त्या पोठोपाठ रिषभ पंत 49, जैस्वाल 40, शुभमन गिल 34 इतक्या धावा केल्या.

213 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.2 षटकांत 170 धावांवर गारद झाला. एकवेळ श्रीलंकेची धावसंख्या एका विकेटवर 140 धावा होती. मात्र, यानंतर श्रीलंकेच्या संघाने 30 धावांत पुढील नऊ विकेट गमावल्या. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक 79 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रियान परागने सर्वाधिक पाच धावा देत तीन विकेट घेतल्या. त्याने 20 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या पाच षटकांत टिच्चून गोलंदाजी केली. या विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील पुढील सामना रविवारी (दि.28) होणार आहे. या सामन्यात कर्णधार सुर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा हा पहिला विजय आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT