'पुष्पा' गाजल्यानंतर आता त्याच्या दुसर्या भागाविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे. 'बाहुबली'नंतर 'कटाप्पाने बाहुबली को क्यों मारा?' हा प्रश्न निर्माण झाला होता. आता 'पुष्पा : द रूल' या आगामी चित्रपटात श्रीवल्ली मरणार असल्याचे म्हटले जात आहे. रश्मिका मंदाना हिने हे पात्र चित्रपटात साकारले आहे. या वृत्तावर 'पुष्पा'चे निर्माते वाय. रविशंकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी चित्रपटात श्रीवल्लीचा मृत्यू दाखविणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे. कथानकाबाबत अनेक अंदाज बांधले जातात व लोक त्यावर विश्वास ठेवतात, असे त्यांनी म्हटले आहे. या चित्रपटाचे शूटिंग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.