अवघ्या सोळा कोटी रुपयांत तयार झालेल्या ' कांतारा' या चित्रपटाची जादू अजूनही रसिकांच्या मनावर कायम आहे. ऋषभ शेट्टीने केलेल्या अफलातून दिग्दर्शनाचा परिसस्पर्श लाभलेल्या या चित्रपटाने उत्पन्नाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता ऋषभने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक रक्षित शेट्टीच्या 'बॅचलर पार्टी' या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऋषभ 'कांतारा पार्ट-2' च्या तयारीत मग्न आहे. त्यामुळे त्याच्याकडे अन्य चित्रपट करण्यासाठी वेळच नाही. परिणामी, त्याने बॅचलर पार्टीला चक्क नकार दिला आहे.