नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपट गेल्या 18 मार्च रोजी रीलिज झाला. तत्पूर्वी, 11 मार्चला विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मीर फाईल्स' रीलिज झाला होता. यापैकी काश्मीरमधील हिंसाचारावर आधारित असलेला चित्रपट सुपरहिट झाला तर बच्चन पांडे धाडकन आपटला. यास कारणीभूत ठरली दोन्ही चित्रपटांची कहाणी. 'बच्चन पांडे' या चित्रपटाच्या अपयशाबद्दल बोलताना अक्षय कुमारने सांगितले की, विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाने माझ्या चित्रपटाला बर्बाद केले.
भोपाळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अक्षय कुमारने सांगितले की, 'द कश्मीर फाईल्स'मध्ये एक कटू सत्य दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट म्हणजे एक आशिर्वादच आहे. मात्र, याच चित्रपटामुळे 'बच्चन पांडे'वर वाईट परिणाम झाला. मात्र, विवेकजी तुम्ही 'कश्मीर फाईल्स' तयार करून देशासमोर एक कटू सत्य ठेवले आहे, हे नाकारता येणे शक्य नाही.