पुढारी ऑनलाईन डेस्क - तिरुपती लाडू वाद सुरु असताना उपमुख्यमंत्री पवन कल्याण खूप चर्चेत आहेत. या संवेदनशील मुद्द्यावर अभिनेता कार्थीच्या कॉमेंटवर पवन कल्याण यांनी प्रतिक्रिया देत सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यानंतर कार्थीने आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची माफी मागितली.
तिरुपती लाडू वादाने गती पकडली आहे. चित्रपट इंडस्ट्रीच्या अनेक दिग्गज ते राजकीय नेत्यांपर्यंत, दोघेही या संवेदनशील मुद्द्यावर आपली मते व्यक्त करत आहेत. या संवेदनशील मुद्द्यावर तमिळ अभिनेता कार्थीने तिरुपती लाडू वादावर आपली प्रतिक्रिया दिल्याने पवन कल्याण यांची सोशल मीडियावर माफी मागितली आहे. कार्थीच्या विधानावर पवन कल्याण यांनी राग व्यक्त करत त्याची शाळा घेतली होती.
दरम्यान, प्रकाश राज नंतर आता 'परुथिवीरण' अभिनेता कार्थी चर्चेत आहे.
२३ सप्टेंबर रोजी कार्थी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या दरम्यान, अँकरने काही मीम्स सादर केले. त्यामधील एक मीम्स लाडूविषयी होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं होतं की, 'आम्हाला आता लाडूविषयी बोलायला नाही पाहिजे. या विषयावर आम्ही बोलू इच्छित नाही, हे सर्व काय आहे'. कार्थीच्या या विधानाने पवन कल्याण नाराज झाले.
२४ सप्टेंबरला विजयवाडामध्ये मीडियाशी संबोधित करताना पवन कल्याण यांनी कार्थीच्या प्रतिक्रियेवर आपली नाराजी जाहिर केली. जर चित्रपट इंडस्ट्रीचे लोक या प्रकरणावर चर्चा करू इच्छितात, एक तर त्यांनी समर्थन करावं किंवा कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. पवन कल्याण यांनी लोकांना सार्वजनिकपणे या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे टाळावे असे सागितले.