श्वेताने मला माझ्या मुलांपासून दूर केले-अभिनव कोहलीने आरोप केले  Instagram
मनोरंजन

श्वेताने मला माझ्या मुलांपासून दूर केले

पुढारी वृत्तसेवा

श्वेता तिवारी हिने कलाजगतात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे; पण ती तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. श्वेताने पहिले लग्न तुटल्यानंतर दुसरे लग्न केले. पण, दुसरे लग्नही फार काळ टिकले नाही. श्वेताने दुसऱ्या पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. त्यामुळे श्वेता चर्चेत आली आहे. श्वेताने गंभीर आरोप केल्यानंतर तिचा दुसरा पती अभिनव कोहलीने ही तिच्यावर आरोप केले आहेत. शिवाय मुलाला भेटू देत नसल्याचेही अभिनवने म्हटले आहे.

यासाठी अभिनवने कायदेशीर मार्गाची मदत घेतली होती. श्वेताने गेल्या ९ महिन्यांपासून मुलगा रेयांश याला भेटू दिले नसल्याचे अभिनव म्हणत आहे. तो म्हणाला की, श्वेताने रेयांश याचा बनावट अहवाल दाखवत, माझा मुलगा मला घाबरत आहे, असा दावा केला. मी श्वेताला १०० हून पेक्षा अधिक मेल केले आणि मला मुलाला एकदा भेटू दे, अशी विनंती केली. पण, तिने मला रेयांश याला भेटू दिले नाही. मी श्वेताच्या पाया पडायलाही तयार होतो. पलक माझी सावत्र मुलगी आहे. पण, मी कायम तिला वडिलांप्रमाणे प्रेम दिलं. वडिलांचे कर्तव्य मी पूर्ण केले. श्वेताने मला माझ्या मुलांपासून दूर केले आहे. दोन्ही घटस्फोटानंतर श्वेता ही दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT